पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऊसाचे पाचट । शेतामध्येच कुजवल्यास मिळणारे फायदे । Sugarcane Farming

इमेज
  ऊसाचे पाचट जाळणे ही जरी वेळ वाचवणारी पद्धत वाटत असली, तरी ती शेतीसाठी 'स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी' आहे. पाचट जाळल्यामुळे होणारे नुकसान केवळ जमिनीपुरते मर्यादित नसून त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. पण हेच पाचट आपण जाळण्या ऐवजी शेतामध्ये कुजवल्यास भरपूर असे फायदे मिळू शकतात.  पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे:- १.जमिनीतील मित्रजीवांचा नाश: - जमिनीचा सुपीकपणा टिकवून ठेवणारे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी आगीच्या उष्णतेमुळे नष्ट होतात. *जमिनीला जिवंत ठेवणारे गांडूळ उष्णतेमुळे मरतात किंवा जमिनीच्या खूप खोलवर जातात, ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. २.अन्नद्रव्यांचा ऱ्हास:- पाचट जाळल्यामुळे त्यातील नत्र (Nitrogen) पूर्णपणे हवेत उडून जातो. * इतर घटक: स्फुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्ये राखेच्या स्वरूपात उरतात खरी, पण ती वाऱ्याने उडून जातात किंवा पाण्यासोबत वाहून जातात. एक टन पाचट जाळल्यामुळे जमिनीचे सुमारे ५ ते ६ किलो नत्र, १ ते २ किलो स्फुरद आणि ८ ते १० किलो पालाश यांचे नुकसान होते. ३.सेंद्रिय कर्बाचे नुकसान:- सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा कणा आहे. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्...