पोस्ट्स

आंतरपीक/मिश्र पीक पद्धती | Intercropping/Mixed Cropping System*

इमेज
  *आंतरपीक/मिश्र पीक पद्धती* आंतरपीक/मिश्र पीक पद्धती ज्यामध्ये दोन किंवा अधिक पिके जवळच्या ठिकाणी वाढतात. दुसऱ्या शब्दांत, आंतरपीक म्हणजे एकाच शेतात एकाच वेळी दोन किंवा अधिक पिकांची लागवड. आंतरपीक घेण्याचे सर्वात सामान्य उद्दिष्ट हे आहे की दिलेल्या जमिनीच्या तुकड्यावर संसाधने किंवा पर्यावरणीय प्रक्रियांचा वापर करून अधिक उत्पादन देणे जे अन्यथा एकाच पिकाद्वारे वापरले जाणार नाहीत. *विविध प्रकार:-* *मिश्र पद्धती:-* नावाप्रमाणेच, हा सर्वात मूलभूत प्रकार आहे ज्यामध्ये घटक पिके उपलब्ध जागेत पूर्णपणे मिसळली जातात. कमीत कमी जागेमध्ये एकमेकास पूरक विविध पिके घेण्याचा प्रयत्न असतो. सर्व भाजीपाला पिके *पट्टा पध्दत:-* एका पाठोपाट एक ओळीत दोन किंवा तीन पिके घेतली जातात. जसे सोयाबीन,भुईमूग *तात्पुरती पीके:-* फळ बागांमध्ये मुख्य पिकाव्यतिरिक कमी कालावधीची पिके घेतली जातात. जी मुख्य पिकासोबत कमी कालावधीत उत्पादन मिळवून देतात. टीप:-यामध्ये एकाच वर्गातील पिके घेणे टाळावे. जसे टोमॅटो-वांगी,टोमॅटो-बटाटा,कलिंगड-काकडी *आंतरपीकांची कीड व्यवस्थापनात मदत:-* पीक विविधता वाढवण्य...

विविध पिकामध्ये फुलगळ | Flowering in various crops

इमेज
  विविध पिकामध्ये फुलगळ होण्याची काय कारणे अनेक पिकांमध्ये मध्ये फुलगळती सामान्य असते. उदाहरणार्थ,भाजीपाला पिक जसे वांगी, नर फुले काही दिवसांनी नैसर्गिकरित्या गळतात. तसेच कलिंगड यांमध्ये, पहिल्या मादी फुलांच्या दोन आठवड्यांपूर्वी नर फुलांचे उत्पादन करण्यास सुरवात करतात. अपुरे परागीकरण, पर्यावरणीय बाबी, जमिनीची कमी सुपीकता आणि थ्रिप्समुळे यामुळे निरोगी फुले अचानकपणे गळू शकतात. परागीभवन:- चांगली वाढ झालेल्या एखाद्या पिकामध्ये जेव्हा फुले काही दिवसांनी गळून पडतात, तेव्हा कदाचित फुलांचे परागकण झालेले नसते. फुलांचे परागिकरण न होण्याची काही कारणे येथे आहेत: दिवसा जास्त तापमान किंवा रात्रीचे कमी तापमानातील बदल परागिकरण रोखतात. तापमानाची सहनशीलता श्रेणी पिकानुसार नुसार बदलते, परंतु जेव्हा दिवसाचे तापमान 29 C. पेक्षा जास्त असते किंवा रात्रीचे तापमान 12 C पेक्षा कमी होते तेव्हा आपण काहीवेळेस फुले गळण्याची शक्यता असते. जेव्हा रात्रीचे तापमान 23 C अधिक असते. तेव्हा टोमॅटोची फुले गळतात. भागातील मधमाश्यांच्या संख्येमध्ये घट झाल्यामुळे, परागिकरणाचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. कीटक...

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेमुळे हरभरा पिकांमधील फायदे । Benefits of Seed Treatment

इमेज
  बीजप्रक्रिया ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी बियाण्याला मातीमधून बुरशीजन्य रोग आणि कीटकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. खरेतर अनेक शेतकर्‍यांना एकतर बीजप्रक्रिया माहित नाही किंवा ते त्याचा वापर करत नाहीत. भारतात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या 70% बियाण्यांवर प्रक्रिया केली जात नाही. किंवा बियाण्यांवर स्वतः बीजप्रक्रिया करणारे फार कमी शेतकरी आहेत. परिणामी देशात घेतली जाणारी बहुतेक पिके बीजप्रक्रिया न करताच केलेल्या बियाण्यांनी घेतली जातात.       बीजप्रक्रिया केवळ बियाणे आणि मातीजन्य रोगांपासूनच नव्हे तर पिकाच्या लवकर वाढीवर परिणाम करणाऱ्या रस शोषणाऱ्या कीटकांपासूनही संरक्षण करू शकते. शेतकऱ्याने या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून पिकाचे नुकसान अगदी सुरुवातीपासूनच कमी होईल. तर आज आपण जाणून घेऊया की हरभरा पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कशी केली जाते आणि त्याचे फायदे काय आहेत? हरभऱ्याची बीजप्रक्रिया:-    बीजजनित रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, पेरणीपूर्वी थायरम 2.5 ग्रॅम किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा थायरम 2.5 ग्रॅम + कार्बनडाझिम 2 ग्रॅम प्रति किलो बि...

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

इमेज
ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था (व्ही. एस. आय) मांजरी, पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणा-या अनेक जाती प्रसारित केल्या आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या वाणांची माहिती आज आपण घेऊयात. * ऊस लागवडीचे तीन हंगाम * सुरु:-१५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी पुर्वहंगामी:-१५ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर, आडसाली:-१५ जुलै ते १५ ऑगस्ट * Co-86032 (निरा):-* केंद्रीय ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथून Co-86032 (निरा) ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लागवड होणाऱ्या या वाणाची १९९६ साली निर्मिती झाली. सुरु, पूर्वहंगामी व आडसाली या तिन्ही हंगामात आपण या वाणाची लागवड करू शकतो. वैशिष्ट्ये:- फुलोरा कमी प्रमानात किंवा लवकर येत नाही. इतर वाणांच्या तुलनेत बेट उमलून पडण्याचे प्रमाणात कमी पाण्याचा ताण व क्षारपट जमिनीत टिकून राहण्याची क्षमता चांगला साखर उतारा * फुले 265 (COM 0265)* ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांच्याकडून प्रसारीत वाण प्रसारित वर्ष:- जू...

रब्बी हंगामातील महत्वाचे पीक | An important crop of Rabi season

इमेज
  रब्बी हंगामातील महत्वाचे पीक 🌱* *🌿हरभरा लागवड पूर्वतयारी* रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र १८.९५ लाख हेक्टर, उत्पादन १७.७७ लाख टन तर उत्पादकता ९३७ किलो/ हेक्टर अशी होती. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा १४.८४ टक्के आहे. *🌱जमीन:- * हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.  *🌱पूर्वमशागत * खरीपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळया दयाव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. या प्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे. *🌱पेरणीची वेळ* हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोय अजिबात नसेल तेथे ...