बीजप्रक्रिया/रोपप्रक्रिया करण्याचे फायदे | Seed/Plant Treatment
🏫IPM SCHOOL🌱 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवगळ्या भागामध्ये वर्षभर वेगवेगळी पिके घेतली जातात. जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तर विदर्भ आणि इतर भागात कापूस पीक आणि कोकण भागात भात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ज्या वेळी बियाण्यांची पेरणी केली जाते त्यावेळी बीजप्रक्रिया आणि ज्यावेळी रोपांची लागण त्यावेळी रोपप्रक्रिया केली जाते. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य त्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास सुरवातीच्या दिवसामध्ये पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. रासायनिक बीजप्रक्रियेनंतर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धता वाढून पिकांच्या वाढीला फायदा होतो. पिकांमध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बीजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होते. यामध्ये वेगवेगळे घटक कार्यान्वित असतात. जमीन व बीजांमार्फत होणाऱ्या रोगप्रसार टाळण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. सर्वसाधारणतः बियाण्याच्या मार्फत पिकांवर ३ प्रकारे रोग येतात. १) बियाण्याच्या बाह्य पृष्ठभागावरील रोगकारक सूक्ष्मजीव. २) बियाण्यांच्या अंतर्गत भागाती