पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीजप्रक्रिया/रोपप्रक्रिया करण्याचे फायदे | Seed/Plant Treatment

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवगळ्या भागामध्ये वर्षभर वेगवेगळी पिके घेतली जातात. जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तर विदर्भ आणि इतर भागात कापूस पीक आणि कोकण भागात भात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.   ज्या वेळी बियाण्यांची पेरणी केली जाते त्यावेळी बीजप्रक्रिया आणि ज्यावेळी रोपांची लागण त्यावेळी रोपप्रक्रिया केली जाते.      पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य त्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास सुरवातीच्या दिवसामध्ये पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. रासायनिक बीजप्रक्रियेनंतर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धता वाढून पिकांच्या वाढीला फायदा होतो. पिकांमध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बीजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होते. यामध्ये वेगवेगळे घटक कार्यान्वित असतात. जमीन व बीजांमार्फत होणाऱ्या रोगप्रसार टाळण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते.  सर्वसाधारणतः बियाण्याच्या मार्फत पिकांवर ३ प्रकारे रोग येतात.  १) बियाण्याच्या बाह्य पृष्ठभागावरील रोगकारक सूक्ष्मजीव.  २) बियाण्यांच्या अंतर्गत भागाती

तूरीमध्ये येणारा वांझ रोग | sterility mosaic disease of pigeonpea

इमेज
🏫IPM SCHOOL🌱  तूरीमध्ये येणारा वांझ रोग :-   वांझ रोग या विषाणुजन्य रोगाचा प्रसार हा एरिओफीड माईट या कोळी जातीच्या कीटकांमार्फत वाऱ्याच्या दिशेने होतो. हे कोळी ‘पीजन पी स्टरिलीटी मोझॅक’ या वांझ रोगाच्या विषाणूचा प्रसार करतात. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तूर पिकात फुले व शेंगा लागत नाहीत. परिणामी उत्पादनात घट येते. त्यामुळे वांझ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एरिओफाईड माईटचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.  किडीची ओळख:- * हा कोळी जवळपास ०.२ मिमी लांबीचा असून हे कोळी साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेचा उपयोग करावा लागतो.  * शरीर अरुंद पांढरट लांब किंवा पिवळसर रंगाचे आणि पायांच्या दोन जोड्या असतात. * कोळी तुरीच्या पानाच्या खालील बाजूस वास्तव्य करतात. आणि पानांतील रस शोषून त्यावर उपजीविका करतात. * कोळी तुरीच्या कोवळ्या शेंगावर अंडी घालतात. अंडी, पिल्ले आणि प्रौढ असा किडीचा जीवनक्रम २ आठवड्यांत पूर्ण होतो. प्रसार:-   कोळ्यांनी वांझ रोगग्रस्त झाडातील रस शोषल्यानंतर त्यांच्या सोंडेमध्ये रस राहतो. शोषलेल्या रसामध्ये वांझ रोगाचे विषाणू असतात. निरोगी झाडांतील रस शोषता

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 सोयाबीन काढणी व काढणी नंतर काळजी काय घ्यावी?    महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे खरिपामधील प्रमुख पीक आहे. सध्या अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. पावसामुळे कापणी मागेपुढे होत आहे. या पिकाची कापणी, मळणी, हाताळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ. योग्य प्रकारे काळजी घेतल्यास बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती टिकवून राहते. पर्यायाने बाजारामध्ये योग्य दर मिळण्यास मदत होते.   सोयाबीन काढणी:- * सोयाबीन पीक पेरणीनंतर साधारणतः ९५ ते १०५ दिवसांत काढणीसाठी तयार होते. पीक परिपक्व झाल्यानंतर पिकाची काढणी लवकर करणे फार महत्त्वाचे आहे. योग्य वेळी काढणी न केल्यास शेंगा तडकून उत्पादनात १५ ते २० टक्के घट येते. * बियाण्यातील ओलावा १४ ते १५ टक्के असताना कापणीला सुरवात करावी. वेळेवर कापणी केल्यास मळणीमध्ये बियांचे नुकसान होत नाही. * पिकाची काढणी धारदार कोयत्याने जमिनीलगत कापून करावी. झाडे उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी. काढणीनंतर सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करून ठेवू नये. यामुळे त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते. *