धैंचा हिरवळीच्या खताची वैशिष्ट्ये | Beneficial Dhaincha green manure | organic farming

 कोणतेही पीक चांगले आणि जोमदार येण्यासाठी पिकाला हवी असणारी अन्नद्रव्ये  देण्याची गरज लागतेच पण हि गरज सध्या रासायनिक खतांच्या माध्यमातून भागवली जात आहे. पिकाला लागणारी अन्नद्रव्ये देण्याची गरज आहेच पण त्यामुळे जमिनीचा पोत,उत्पादकता टीकून राहणे गरजेचे आहे. 

  

जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खतांची गरज भागविण्यासाठी हिरवळीची खते शेतीला व शेतकरयांना वरदान ठरू शकतात. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानासह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडणे होय. हि पिके जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबर जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात.



हिरवळीचे खते दोन प्रकारचे आहेत:-

१) हिरवळीच्या खताचे पिक शेतात वाढवून फुलोरयापूर्वी ते जमिनीत गाडणे.[उदा.बोरू , ढेंचा, चवळी इत्यादी.]

२) हिरवळीच्या खताचे पिक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने शेतात आणून जमिनीत मिसळणे, गाडणे [उदा. गिरिपुष्प, सुबाभूळ, शेवरी इत्यादी.]


धैंचा लागवड:-

कुळवाच्या आडव्या उभ्या पाळ्या देऊन शेत तयार करून घ्यावे. त्यानंतर दीड ते दोन फुट अंतरावर सऱ्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस धैंचा बियाणे पेरावे. एकरी २० ते २५ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ पाणी द्यावे. नांगर किंवा ट्रक्टरने नांगरून जमिनीत गाडावे. १०-१२ दिवसानंतर वखराच्या [कुळवाच्या] आडव्या उभ्या पाळ्या देऊन सर्व अवशेष जमिनीत मिसळून पुढील पिकासाठी शेत तयार करावे.


धैंचा हिरवळीच्या खताची वैशिष्ट्ये:-

* धैंचा हलक्या , मध्यम , भारी आणि क्षारयुक्त जमिनीतही भरपूर वाढतो.

* धैंचाच्या वाढीवर कमी ओल किंवा अधिक पाणी या गोष्टींचा फारसा वाईट परिणाम होत नाही.

* धैंचाची वाढ झपाट्याने होत असल्याने केवळ ४५-५० दिवसांनतर जमिनीत गाडल्यामुळे पूर्णपणे कुजून त्याचे खत पुढील पिकास उपलब्ध होते.

* धैंचापासून प्रती एकर ८ टन हिरवळीचे खत मिळते जे एकरी २२ टन शेणखताएवढा फायदा शेतकऱ्यास देते.म्हणजेच काय तर १०० किलो हिरवळीचे खतामधून २८० किलो शेणखताएवढे सत्त्व पोषकतत्त्वे पिकाला उपलब्ध होतात. 

* धैंचा कुजत असतांना सूक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीस चालना मिळून त्यापासून पोषक सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते, पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते.

* धैंचामुळे भरपूर कॅल्शियम उपलब्ध होऊन जमीन चिबड करणारे पाण्यात न विरघळणारे सोडीयमचे क्षार द्राव्य अवस्थेत येऊन पावसाचे वा ओलिताचे पाण्याद्वारे त्यांचा निचरा होऊन अशा जमिनींची सुपीकता वाढते.

* धैंचा द्विदलवर्गीय पिक असल्याने वातावरणातील नत्र जमिनीत साठवून ठेवण्यास मदत करते.

* धैंचामुळे पुढील पिकास प्रती एकर ३५ किलो नत्र , ७.३ किलो स्फुरद , १७.८ किलो पालाश , १.९ किलो गंधक , १.४ किलो कॅल्शिअम , १.६ किलो मॅग्नेशिअम हि अन्नद्रव्ये आणि जस्त- २५ पी.पी.एम., लोह-१०५ पी.पी.एम.,तांबे - ७ पी.पी.एम. हि सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. 

संदर्भ-इंटरनेट 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean