विविध पिकामध्ये फुलगळ | Flowering in various crops

 



विविध पिकामध्ये फुलगळ होण्याची काय कारणे

अनेक पिकांमध्ये मध्ये फुलगळती सामान्य असते. उदाहरणार्थ,भाजीपाला पिक जसे वांगी, नर फुले काही दिवसांनी नैसर्गिकरित्या गळतात. तसेच कलिंगड यांमध्ये, पहिल्या मादी फुलांच्या दोन आठवड्यांपूर्वी नर फुलांचे उत्पादन करण्यास सुरवात करतात. अपुरे परागीकरण, पर्यावरणीय बाबी, जमिनीची कमी सुपीकता आणि थ्रिप्समुळे यामुळे निरोगी फुले अचानकपणे गळू शकतात. परागीभवन:- चांगली वाढ झालेल्या एखाद्या पिकामध्ये जेव्हा फुले काही दिवसांनी गळून पडतात, तेव्हा कदाचित फुलांचे परागकण झालेले नसते. फुलांचे परागिकरण न होण्याची काही कारणे येथे आहेत: दिवसा जास्त तापमान किंवा रात्रीचे कमी तापमानातील बदल परागिकरण रोखतात. तापमानाची सहनशीलता श्रेणी पिकानुसार नुसार बदलते, परंतु जेव्हा दिवसाचे तापमान 29 C. पेक्षा जास्त असते किंवा रात्रीचे तापमान 12 C पेक्षा कमी होते तेव्हा आपण काहीवेळेस फुले गळण्याची शक्यता असते. जेव्हा रात्रीचे तापमान 23 C अधिक असते. तेव्हा टोमॅटोची फुले गळतात. भागातील मधमाश्यांच्या संख्येमध्ये घट झाल्यामुळे, परागिकरणाचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. कीटकनाशकांचा वापर मर्यादित करा. मधमाश्या आणि इतर अनेक परागीकरणात मदत करणारे कीटक थंडी किंवा पावसाळ्याच्या दिवसात उडत नाहीत. वातावरणातील बदल:- तापमानातील चढउतार, वनस्पतींच्या फुलांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. उच्च तापमानातील फुलांच्या गळती व्यतिरिक्त, अपुरा प्रकाश, निरोगी झाडांची फुले झडण्याचे कारण बनू शकतो. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये फुलावर व इतर भागावर जमा होणाऱ्या दवबिंदूंवर अनेक बुरशींचे बिजाणू वाढू शकतात. फुलांच्या नाजूक देठावर बुरशी वाढत असेल तर त्यामुळे सुद्धा फुले गळु शकतात. मातीची सुपीकता:- जमिनीची कमी सुपीकता असल्यामुळे फुलांचे प्रमाण कमी किंवा फुलगळ होऊ शकते. फुलोऱ्या येत असताना खत घालण्यापेक्षा, फुले येण्या आधीच पिकास योग्य खते पुरवणे गरजेचे असते. थ्रीप्स(फुलकिडे):- थ्रीप्सच्या प्रादुर्भावामुळे कळ्या आणि फुले देखील झाडांवर गळू शकतात. हे लहान कीटक कळ्यांच्या आत जातात आणि पाकळ्या खातात. जरी थ्रीप्स ऊघडया डोळ्यांनी नीट दिसत नसले तरी , आपण पाकळ्यांवर ब्लॉचिंग आणि स्ट्रेकिंग पाहू शकता. स्पिनोसॅड हे पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित कीटकनाशक आहे जे थ्रिप्स मारते, कीटकनाशकांचा थ्रीप्सशी संपर्क येणे कठीण असते कारण ते कळ्यामध्ये बंद असतात. गवत आणि तण नियंत्रित करणे, प्रादुर्भावित कळ्या काढणे आणि नष्ट करणे आणि नियमितपणे पाण्याने झाडांवर फवारणी करणे या गोष्टी थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी करू शकतो.

*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*

🌱भागीनाथ असणे, अहमदनगर

🌱सत्यजित मिरापुरे, यवतमाळ

🌱श्रीकांत पाटील, पन्हाळा

*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*



*अधिक जानकारी के लिए हमारी वेबसाइट को visit करें।👇*

*Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

*Instagram:-*

*Facebook:-* 

*Linkedin:-* 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy