सुरुवातीच्या काळात पिकासाठी आवश्यक जिवाणू । कार्य आणि फायदे । Use of Bio fertilizer
पिकाच्या वाढीसाठी खरेतर मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते यापैकी नत्र, स्फुरद आणि पालाश हि मुख्य अन्नद्रव्यांची गरज पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत जास्त दिसून येते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात नत्रयुक्त खताचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. ज्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन जास्त चांगले उत्पन्न पिकापासून मिळेल. सध्या रासायनिक खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे अश्या परिस्थितीत पिकाला देत असलेली भरखते पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध झाली तर खतांवर होणार खर्च कमी होऊन पिकाची वाढ सुद्धा चांगली होईल. आणि यासाठीच जिवाणूंचा वापर केल्यास खूप चांगले परिणाम दिसून येतील. पण पिकाच्या अवस्थेनुसार जिवाणूंचा उपयोग करावा लागतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये द्यायचे जिवाणू पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पिकाला जास्त गरज नत्राची असते तरीही स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्येही तितकीच महत्वाची असतात. वेगवेगळ्या पिकानुसार नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू वेगळे असतात आणि पिकानुसार त्यांचा वापर करणे गरजेचे असते. अझाटोबॅक्टर - हे जिवाणू शेंगवर्गीय पिके वगळत...