भात पिकांमधील उत्पादन वाढीचे तंत्र । युरिया ब्रिकेटचा वापर । Paddy Farming
महाराष्ट्रामध्ये भाताचे पीक काही भागात जास्त प्रमाणात होते तर काही कमी प्रमाणात घेतले जाते. प्रामुख्याने कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना वेगवेगळे रासायनिक खते किंवा युरियाचा वापर कारण्याऐवजी जर युरिया ब्रिकेटचा वापर केला तर खताचा अपव्यय टाळून उत्पादन वाढीसाठी नक्कीच फायदा मिळणार आहे. तर आज आपण हे युरिया ब्रिकेट काय आहे आणि त्याचा वापर कसा करता येईल याची संपूर्ण माहिती घेऊया. युरिया ब्रिकेट युरिया ब्रिकेट म्हणजे युरिया खताची दाबून तयार केलेली गोळी. ही गोळी साधारणपणे २.७ ते ३ ग्रॅम वजनाची असते आणि ती हळूहळू जमिनीत विरघळते. यामुळे युरियाची कार्यक्षमता वाढते आणि झाडांना दीर्घकाळ नत्राचा पुरवठा होतो. वापर कधी करावा? * भात रोप लागणी झाल्यानंतर ७ ते १० दिवसांनी युरिया ब्रिकेटचा वापर करणे सर्वात योग्य मानले जाते. या वेळेस झाडांना नत्राची सर्वाधिक गरज असते आणि ब्रिकेटमुळे त्यांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात नत्र मिळते. * जर भात रोपांच...







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा