पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निंबोळी पेंड/खताचे फायदे । सेंद्रिय खत । Benefits of Neem Fertilizer

इमेज
  सध्या चालू असलेला भरमसाठ रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकांचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम जाणून बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागले आहेत. सेंद्रिय शेती करताना सेंद्रिय गोष्टींचा वापर अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये शेणखत, गांडूळ खत, निंबोळी खत, कंपोस्ट खत यासोबत निमतेल, दशपर्णी अर्क, वेगवेगळे जैविक खतांचा, औषधांचा उपयोग सेंद्रिय खेती करताना अतिशय महत्वाचा ठरू शकतो.    सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी खत/निंबोळी पासून तयार केलेल्या खताचा औषधांचा उपयोग अतिशय महत्वाचा ठरतो. कडूलिंबाचा लिंबोळ्या या पासून निंबोळी पेंड तयार केली जाते. ऑरगॅनिक स्वरूपाचे खत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी या खताला आहे तसेच सेंद्रिय शेती साठी अत्यंत आवश्यक अशी ही निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंड ही फळबागायतदार कांदा उत्पादक शेतकरी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला खूप आवश्यक आहे. निंबोळी पेंडचा शेतात वापर:-   निंबोळी पेंड शेणखत तसेच इतर सेंद्रिय खतांसोबत वापरण्यास अतिशय सुलभ आहे. रासायनिक खतांच्या बेसल डोसमध्ये देखील वापरता येते. निंबोळी पेंड मुळांच्या कार्यक्षेत्रात व्यवस्थ...

पिकामधील मुख्य अन्नद्रव्ये । कमतरता लक्षणे । Deficiency Symptoms of NPK

इमेज
   पिकांच्या वाढीसाठी अनेक गोष्टी आवश्यक/परिणामकारक होतात. ज्यामध्ये आपल्याला सुपीक माती, पाणी, हवामान, किडी आणि रोग यांचे परिणाम पिकांच्या वाढीवर दिसतात.    या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोषक तत्वांची (अन्नघटकांची) गरज. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी सुमारे १६ पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्यातील मुख्य पोषक तत्वे म्हणजे नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस) आणि पालाश (पोटॅश). यासोबतच पिकाला आवश्यक असलेले दुय्यम पोषक घटक आणि सूक्ष्म पोषक घटक देखील असतात. तर आज आपण जाणून घेऊया की जेव्हा मुख्य पोषक तत्वांची म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश यांची कमतरता असते तेव्हा पिकात कोणती लक्षणे दिसतात. पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे नत्र (नायट्रोजन) अन्नघटकाच्या कमतरतेची लक्षणे:- * पिकात झाडांची/रोपांची खालची पाने पिवळी पडतात, तर झाडाच्या वरच्या बाजूला असलेली पाने हलकी हिरवी होतात. * वनस्पतींमध्ये कमकुवत कोंब किंवा फांद्या दिसतात. * कालांतराने, पाने तपकिरी होतील आणि कोमेजतील आणि अखेर गळून पडतील. * झाडांची वाढ थांबून फुले आणि फळे कमी होतील. * रोपांची वाढ थांबते. * नवीन पानां...

नारळामधील कीड । गेंड्या भुंगा नुकसान आणि व्यवस्थापन । Rhinoceros Beetle ।

इमेज
  नारळाचे पीक काही भागामध्ये व्यवसाय म्हणून घेतले जाते तर काही शेतकरी नारळाची काही झाडे बांधावर लावतात. ज्यामुळे त्यांना गरज पडणारे नारळ त्यांना बाजारातून विकत घ्यावे लागणार नाहीत. नारळाच्या झाडाचे काही कारणामुळे नुकसान होते, त्यामध्ये काही कारणामुळे झाडाचे नुकसान होऊन त्याचा परिणाम फळ लागणीवर हि होतो.   नारळ झाडाचे प्रामुख्याने नुकसान हे किडींमुळे होते, यामध्ये गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, पाने खाणारी काळ्या डोक्याची अळी, वाळवी, एरिओफाईट कोळी, यासारख्या किडींचा समावेश होतो.  वरील फोटोमध्ये दिसणारे हे नुकसान गेंडा भुंगा या किडीमुळे झालेले आहे. आज आपण हि कीड नुकसान कशा प्रकारे करते आणि त्याचे नियंत्रण उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.  गेंडा (भुंगा) बीटल ज्याचं शास्त्रीय नाव ओरेक्टेस ऱ्हिनोसेरॉस आहे. या भुंग्यांचा प्रादुर्भाव वर्षभर असतो पण परंतु जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांची संख्या सर्वाधिक असते. नुकसान * पाने कोवळी आणि पोंग्यात असताना कट करतो ज्यामुळे आपल्याला नंतर पाने हि त्रिकोणी आकारामध्ये कट झालेली दिसतात.  * त्याचबरो...

पिकामध्ये येणाऱ्या किडींसाठी प्रतिबंधात्मक उपाय । एकात्मिक कीड व्यवस्थापन । IPM

इमेज
  शेतकऱ्याला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागते ते म्हणजे पिकामध्ये कीड आणि रोग यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानाला. अगदी सुरुवातीपासून यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे शेतकरी पिकामध्ये किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करताना दिसून येतात. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा उपयोग केल्यास चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण होऊन खर्च आणि पिकाचे नुकसान वाचवू शकतो. तर आज आपण पिकामध्ये कीड येऊ नये म्हणून किडींच्या प्रतिबंधासाठी कोणकोणते उपाय करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत.  पिकामध्ये येणाऱ्या किडींसाठी प्रतिबंधक उपाय:- मशागत  जमिनीची मशागत केल्यामुळे जमिनीमध्ये असणारी कीड, किडीचे कोष जमिनीच्या बाहेर येतात आणि एकतर पक्षी त्यांना वेचून खातात किंवा प्रखर उन्हामुळे नष्ट होतात त्यामुळे पुढील पिकामध्ये येणारी किड काही प्रमाणात कमी होते.  जुन्या पिकाच्या अवशेषांची विल्हेवाट त्या जमिनीमध्ये असणारे जुन्या पिकाचे अवशेष, कीड आणि रोगग्रस्त रोपे नष्ट करणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. कारण त्यावर कीड जिवंत राहून ज्यावेळी पुढे मुख्य पीक घेतले जाते त्यावेळी किडीचे प...

उन्हाळ्यात पिकांची काळजी घेताना येणाऱ्या समस्या । Summer Vegetables

इमेज
  उन्हाळ्यामध्ये शेतकरी वेगवेगळी पिके घेताना दिसून येतात. ऊसासारख्या नगदी पिकांबरोबरच बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला तसे वेलवर्गीय भाजीपाला देखील पिकवतात. वेगवेगळ्या भागांनुसार पिके जरी बदलत असली तरी उन्हाळ्यामध्ये सर्वच पिकांची काळजी घेताना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते.    एकतर उन्हाळ्यामधील कडक उन्हाचा कोवळ्या भाजीपाला पिकावर अधिक परिणाम दिसून येतो आणि त्यामध्ये पाणी व्यवस्थापन करताना अडचण अली तर खुप अधिक नुकसानाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आज आपण उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला कोणकोणत्या समस्या येतात याबद्दल माहिती घेणार आहोत.  उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या समस्या:- पाण्याची कमतरता:-  उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता कमी होते, ज्यामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे पिकांचे उत्पादन घटते किंवा पीक पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते. सिंचनासाठी जास्त खर्च करावा लागतो किंवा पाण्याचा पुरवठा कमी असल्याने सिंचन करणे कठीण होते. उष्णतेमुळे होणारे पिकांचे नुकसान:-   वाढत्या तापमानामुळे पिकांवर ताण येतो, ज्यामुळे पिके सुकतात किंवा त्यांचे उत्प...

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing

इमेज
  उन्हाळा हंगाम हा अतिशय महत्वपूर्ण काळ आहे ज्यामध्ये रब्बी पिके काढून पुढे येणाऱ्या खरीप हंगामासाठी जमीन तयार करणे. ज्यामध्ये शेतीमध्ये जमीन तयार करून घेणे पुढे घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी अतिशय महत्वपूर्ण काम आहे.  जमिनीची खोल नांगरणी करून उन्हामध्ये तापत ठेवले जाते, ज्याचा अनेक नैसर्गिक व शाश्वत फायद्यांसाठी उपयोग होतो. ही प्रक्रिया केवळ तण व किड नियंत्रणापुरती मर्यादित नसून, जमिनीचा पोत आणि संरचना  सुधारण्यास आणि पुढील हंगामाच्या योग्य तयारी करण्यासाठीही महत्त्वाची ठरते.    आज आपण उन्हाळ्यामध्ये केल्या जाणाऱ्या खोल नांगरणीचे फायदे कोणते आहेत ज्यामुळे शेतकऱ्याला पुढे घेतल्या जाणाऱ्या पिकामध्ये फायदा मिळून उत्पन्न वाढेल? *जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापत ठेवण्याचे फायदे* *जमीन नांगरणी करताना सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी कारण त्यावेळेस नांगरणी करताना शेतामध्ये पक्षी जमून जमिनीमधून बाहेर पडणारी अळी अवस्था, किडीचे कोष तसेच इतर कीटक खातात त्यामुळे नैसर्गिक कीड नियंत्रण होते.  *रोग व किडींचा नैसर्गिकरित्या नायनाट होतो* उन्हाळ्यामध्ये खोल नांगर...