पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेवगा | Pest of Drumstick | कीड |

इमेज
  कोरडवाहू आणि हलक्या जमिनीमध्ये येणारे चांगले पीक म्हणजे शेवगा. शेवगा हे कमी पाणी क्षेत्रामध्ये तग धरून राहते आणि चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते. सध्या पावसाची स्थिती चांगली आहे, पण बऱ्याचवेळा पाऊस कमी होत असतो. यामुळे अशा परिस्थितीत तग धरुन राहणारे पीक म्हणजे शेवगा. पण या पीकावरही रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो.  शेवगा पिकामध्ये येणारी कीड फुलकिडे:-  या किडीची पिले आणि प्रौढ कोवळी पाने आणि शेंगांचा पृष्ठभाग खरवडतात आणि त्यातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर आणि शेंगांवर चट्टे पडतात. शेंगांचा आकार वेडावाकडा होतो. फुलकिडे खरवडलेल्या भागावर बुरशींचा शिरकाव होऊन बुरशीजन्य रोग वाढतात. तसेच शेंगांची प्रत खराब होते. नियंत्रण:-  लागवडीच्या वेळी जमिनीमध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा. शेतामध्ये प्रति एकरी २० निळे चिकट सापळे लावावेत. फुलकिडे दिसू लागल्याबरोबर करंज तेल १ मि.ली. प्रति लीटर याप्रमाणे फवारावे. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असल्यास रासायनिक फवारणी करावी त्यामध्ये  डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी १२  ग्रॅम, फिप्रोनील ५ एससी ३० मिली किंवा अॅसिफेट ७५  एसपी ८ ग्रॅम. प्रती १० लिट

भात पिकामध्ये नुकसान करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो | Infestation of damaging insects in rice crop

इमेज
  भात हे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात तसेच कोकणात प्रामुख्याने घेतले जाणारे पिक आहे. खरिपामध्ये भात पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसून येते.काही भागात पेरणी केली जाते, तर काही भागामध्ये रोप लावणी द्वारे भात पिक लावले जाते.  भाताचे कमी उत्पादन मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे किडीचा प्रादुर्भाव आहे. रोपांच्या अवस्थेपासून ते पिक काढणीपर्यंत वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला भात पिकामध्ये दिसून येतो. कीड नियंत्रणासाठी पिकामध्ये कोणकोणत्या किडी येतात हे माहिती असल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी मदत होईल आणि आपला उत्पादन खर्चही कमी होईल.    भात पिकामध्ये येणाऱ्या किडी:- लष्करी अळी (Spodoptera mauritia):-  अळया लष्कीराप्रमाणे हल्ला करतात. रोपांना मोठया प्रमानात कुरतडतात. अळया पाने कुरतडतात त्यामुळे धानाचे पिक निष्पर्ण होते. तसेच पीक लोंबी अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला आढळतो.अळया रात्री कार्यक्षम असून दिवसा धानावर, बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. गादमाशी (Gall midge, Orseolia oryzae):- या

सुरवातीच्या काळात सोयाबीनमध्ये किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो | In the initial period, the infestation of insects is seen

इमेज
  सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरिपामध्ये घेतले जाणारे प्रमुख पीक आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात याची पेरणी केली जाते. यावर्षी पावसाचे आगमन वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळेस झाल्यामुळे काही ठिकाणी पेरणी लवकर झाली तर काही ठिकाणी उशिरा झाली.     सोयाबीन पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळापासून दिसून येतो त्यामुळे आपल्याला एकात्मिक पद्धतींचा अवलंब करणे महत्वाचे आहे तरच आपण किडींचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करून चांगले उत्पादन घेऊ शकतो. पण राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात दिसू शकतो. सोयाबीन मध्ये सुरुवातीच्या काळात या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  पाने खाणारी अळी:-   सोयाबीन मध्ये सुरुवातीपासून पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पीक दोन पानांवर आल्यापासूनच या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. लहान अळ्या पाने खरवडतात आणि अळी मोठी झाल्यानंतर पानाचा मधला भाग खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवते.  पाने गुंडाळणारी अळी:-   सोयाबीनमध्ये दुय्यम असणारी हि कीड सध्या प्रमुख कीड म्हणून दिसून येत आहे.खरिपापाठोपाठ उन्हाळ्यामध्

ऊसामधील महत्वाचे रोग | Important Diseases of Sugarcane

इमेज
   उसावरील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन  ऊस हे महाराष्ट्रात महत्वाचे नगदी पिकांपैकी एक पीक आहे. ऊस एक उष्णकटिबंधीय व बहूवर्षीय पीक आहे. उसामध्ये विविध अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, फॉस्फरस व इतर इलेकट्रॉयट्सचे प्रमाण जास्त आहे, जे निर्जलीकरणासाठी उत्कृष्ठ आहे. ऊसामध्ये व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी ६. व्हिटॅमिन क तसेच क्षारांचे प्रमाण पण जास्त असते. ऊस हा गुळ, साखर, रम, इथेनॉल आणि जैवइंधनासाठी एक मूलभूत घटक आहे. उसाच्या लागवडीचे ३ हंगाम असतात. सुरु (१२-१३ महिने), पूर्वहंगामी (१४-१५ महिने) आणि आडसाली (१६-१८ महिने). त्याच्या एम एस १०००१,निरा, फुले सावित्री, फुले २६५, को- ९२००५, महालक्ष्मी, व्ही. एस. आय ४३४ या प्रसिद्ध जाती महाराष्ट्रात लागवडीखाली आहेत. महाराष्ट्रात ऊस पिकावर विविध प्रकारच्या ३० रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये तांबेरा, पोक्का बोईंग, लालकूज, मोझेक, गवताळ वाढ, मर आणि पानावरील ठिपके या रोगांचा समावेश आहे.   पोक्का बोइंग:-  हा रोग हवेद्वारे पसरतो. मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व पावसामुळे हवेत वाढले

बीजप्रक्रिया/रोपप्रक्रिया करण्याचे फायदे | Seed/Plant Treatment

इमेज
   संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवगळ्या भागामध्ये वर्षभर वेगवेगळी पिके घेतली जातात. जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तर विदर्भ आणि इतर भागात कापूस पीक आणि कोकण भागात भात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.   ज्या वेळी बियाण्यांची पेरणी केली जाते त्यावेळी बीजप्रक्रिया आणि ज्यावेळी रोपांची लागण त्यावेळी रोपप्रक्रिया केली जाते.      पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य त्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास सुरवातीच्या दिवसामध्ये पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. रासायनिक बीजप्रक्रियेनंतर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धता वाढून पिकांच्या वाढीला फायदा होतो. पिकांमध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बीजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होते. यामध्ये वेगवेगळे घटक कार्यान्वित असतात. जमीन व बीजांमार्फत होणाऱ्या रोगप्रसार टाळण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते.  सर्वसाधारणतः बियाण्याच्या मार्फत पिकांवर ३ प्रकारे रोग येतात.  १) बियाण्याच्या बाह्य पृष्ठभागावरील रोगकारक सूक्ष्मजीव.  २) बियाण्यांच्या अंतर्गत भागातील रोगकारक सूक्

बियाणे खरेदी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी |

इमेज
  खरीप हंगाम सुरु होत असल्यामुळे सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेगवेगळ्या भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते. परंतु आपल्याला पेरणीसाठी उत्कृष्ट प्रमाणित बियाणे माहित असणे गरजेचे असते. बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तर त्याचा पूर्ण फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आणि पूर्ण हंगाम वाया जातो. त्यामुळे बियाणे खरेदी करण्याच्या वेळी काळजी घेणे गरजेचे आहे.   बियाणे खरेदी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी * बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू नये. तसेच, कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाण्याची खरेदी करू नये. बियाणे अभ्यासपूर्वक खरेदी करावे. * खरेदी करावयाच्या बियाणे वाण/जात यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का, हे जाणून घ्यावे. निवडलेला वाण कोणत्या किडीसाठी अथवा रोगासाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील आहे का, याची माहिती घ्यावी. * निवडलेला वाण किती कालावधीचा आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची माहिती घ्यावी.  * भाजीपाला बियाण्याच्या बाबतीत तो वाण कोणत्या हंगामासाठी शिफारस केलेला आहे व कोणत्या कालावधीपर्य

सोयाबीनचे वाण व त्यांची वैशिष्ट्ये | Soybean varieties and their characteristics

इमेज
  खरीप हंगाम सुरू होणार असून खरीप हंगामात देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड केली जाते. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि इतर काही राज्यांमध्येही अनेक भागात सोयाबियाची  लागवड केली जाते. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी आपली शेतं तयार करून पावसाची वाट पाहत आहेत.  चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात चांगल्या वाणांची निवड, किडी व्यवस्थापन, रोगांचे व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन यांचाही समावेश आहे. परंतु सर्वप्रथम शेतकऱ्यांनी चांगल्या वाणांची निवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले पीक घेता येईल. तर आज आपण जाणून घेऊया की या खरीप हंगामात चांगले उत्पादन देणारे वाण कोणते आहे  1.फुले संगम (के.डी.एस.-७२६) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे २०१७-१८ साली   प्रसारित झालेले, १०५-११० दिवसांत परिपक्व होणारे, जाड दाणा, भारीजमीन व चांगले व्यवस्थापन असेल तर अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण. लागवडीसाठी ४५ x ८-१० सेंमीअसेअंतर ठेवावे. जाड व चमकदार दाणा. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५-३० क्विंटल. 2.फुलेकिमया(के.डी